Crop: कांदा | Topic: E.कांदा पिकात येणाऱ्या अडचणी

कांदा रोप पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होत असेल तर काय उपाययोजना कराव्यात?

रोपांची मर होण्याची कारणे 

✅कांदा रोपांची मर पुर्नलागवडीनंतर होत असेल तर त्याचे प्रमुख कारण हे पिथियम बुरशीचा रोपांवर झालेला प्रादुर्भाव आहे. जेव्हा आपण रोपांची पुर्नलागवड करतो, तेव्हा माती रोपांच्या मुळांवर चिटकते तिथे पिथियम गटातील बुरशीचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे रोपे शेंड्याकडून पिवळी पडायला लागतात व कालांतराने अशा रोपांची मर होते. त्यानंतर पांढऱ्या  किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर त्या प्रादुर्भाव झालेल्या रोपांवर दिसतो.

उपाययोजना 

या अडचणीवर  उपाययोजना  करण्यासाठी एकात्मिक, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकात्मिक उपाययोजना 

एकात्मिक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त अडचणींवर एकत्रितपणे उपाययोजना करणे होय.यामध्ये आपण खालील एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेताची निवड :
शेताची निवड करताना अशा जमिनीची निवड करा की ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असावी, म्हणजेच काळी-तांबट किंवा तांबट जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या काळ्या  किंवा गाळाच्या मातीची निवड  लागवडीसाठी करू नये. जेवढा जास्त काळ ओलावा राहतो, तेवढा या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार जलद गतीने होतो. त्याचबरोबर अशा जमिनीची निवड करा. ज्या जमिनीमध्ये पाणी व पाण्याचा निचरा लवकर होईल. जेणेकरून रान लवकर वाफस्यावर येईल व कोरडे होईल.
शेताची निवड कशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

शेताची मशागत :
शेताची निवड  केल्यानंतर शेताची मशागत करताना शेत खोलवर नांगरून 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. त्यानंतर तणांचे अवशेष व  मागील पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून टाकून द्या, जेणेकरून त्याबरोबर बुरशीचे बीजाणू शेताच्या बाहेर जातील.सारे किंवा गादीवाफे उतार बघून सोडा, जेणेकरून पाणी शेतामध्ये साठणार नाही व पाण्याचा निचरा होऊन लवकर सुकेल.अशा प्रकारे शेताची मशागत केल्यास पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होणार नाही.
शेताची मशागत कशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होऊ नये म्हणून अगोदरच हव्या त्या उपाययोजना करणे होय. रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ न देणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

रोप प्रक्रिया :
रोपांवर लागवडी अगोदर जर बुरशीनाशकांची प्रक्रिया केली तर रोप लागवडीनंतर रोपांवर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपांच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार होतो. ज्यामुळे बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांवर अंकुरु देऊ शकत नाहीत.
रोप प्रक्रिया अशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

योग्य पाणी नियोजन :
बुरशीचा प्रादुर्भाव हा तेव्हा होतो जेव्हा शेतामध्ये जास्त काळ गरजेपेक्षा जास्त ओलावा असतो. ओलाव्यामध्ये या बुरशीचे बीजाणू मुळांवर अंकुरतात व ओलाव्यामार्फत एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. त्यासाठी या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी योग्य प्रकारे मातीच्या गुणवत्तेनुसार व प्रकारानुसार पाणी नियोजन करणे गरजेचे आहे.
याची माहिती घेण्यासाठी खालील फोटो किंवा लिंक वर क्लिक करा. 

✅फवारणी नियोजन :
रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर पहिले पाणी देऊन खालीलपैकी एक फवारणी केल्यास रोपांची मर ही रोपवाटीकेमध्ये होणार नाही.
फवारणी विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

उपचारात्मक उपाययोजना 

उपचारात्मक उपाययोजना म्हणजे  रोपांची मर होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या  उपाययोजना. यामध्ये पहिली उपायोजना आहे या बुरशीचा प्रसार रोखणे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी या रोगांची लक्षणे दिसायला लागली की शेताचे पाणी बंद करावे. जेणेकरून शेत कोरडे होईल व बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही

✅फवारणी नियोजन :
आपल्या शेतामध्ये जर रोपांची मर होऊ लागली असेल तर खालील पैकी एक फवारणी दाट करावी.