डाऊनी
जबाबदार बुरशी
✅ कांदा रोप लागवडीनंतर रोपवाढीच्या टप्प्यात व कंद निर्मितीच्या टप्प्यात फुगवणीच्या व कंद काढणीच्या टप्प्यात Pernosporalos या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकात डाऊनी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.
पोषक वातावरण
✅ जेव्हा तापमान 10०C ते 27०C च्या दरम्यान असतो, व आद्रता ही 80 ते 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचे बीजाणू कांदा रोपांच्या अवयवांवर अंकुरतात व या बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव होतो.
लक्षणे
✅ या बुरशीजन्य रोगाची लक्षणे ही पातीवर, कांदा मानेवर व कांदा कंदावर दिसतात.एकापेक्षा जास्त कांदा पातीवर सुरुवातीला फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात.या ठिपक्यांचे प्रमाण वाढते व ठिपक्यांचे रूपांतर भागात होते व त्यांचा रंग तपकिरी होतो. तसेच तिथून पात पिचकते शेंडे करपायला लागतात. रोगांची लक्षणे ही मानेवर दिसतात. ज्यामुळे मानेची कुज होते ज्यामध्ये मान सडल्यागत होते व पाणी शोषल्यागत होते व तिथून कांदा पात कोलमडून पडते. कालांतराने पूर्णपणे पातीचे शेंडे करपतात पात पिवळी पडते रोपांची वाढ खुंटते व रोपांची वाढ थांबून उत्पादनात घट होते.
प्रसार
✅ या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात वाऱ्याद्वारे सुद्धा होतो. म्हणजेच या बुरशीजन्य रोगांचा प्रसार एका भागात हवेमार्फत होतो. त्याचबरोबर या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात पानांवर असणाऱ्या ओलाव्यामार्फत सुद्धा होतो.यामध्ये जर पावसामुळे पाती ओल्या झाल्या तर एका भागातून दुसऱ्या भागात या बुरशीचा प्रादुर्भाव त्या ओलाव्यामार्फत होतो.तसेच जर धुके पडले असेल तर धुक्यामुळे पातीवर सकाळच्या वेळेस ओलावा निर्माण होतो. ज्यामुळे या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.त्याचबरोबर ज्यावेळेस आपण जलसिंचन हे तुषार सिंचन पद्धतीद्वारे करत असाल तर त्यामुळे जे पातीवर पाणी साठते व त्यामुळे जो ओलावा निर्माण होतो व या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
एकात्मिक उपाययोजना
✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त अडचणींवर एकत्रितपणे उपाययोजना करणे होय.यामध्ये आपण खालील एकात्मिक उपाय योजना करणे गरजेचे आहे.
शेताची निवड :
शेताची निवड करताना अशा जमिनीची निवड करा की ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असावी, म्हणजेच काळी-तांबट किंवा तांबट जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या काळ्या किंवा गाळाच्या मातीची निवड लागवडीसाठी करू नये. जेवढा जास्त काळ ओलावा राहतो, तेवढा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद व प्रसार गतीने होतो. त्याचबरोबर अशा जमिनीची निवड करा ज्या जमिनीमध्ये पाणी व पाण्याचा निचरा लवकर होईल. जेणेकरून रान लवकर वाफस्यावर येईल व कोरडे होईल.
शेताची मशागत :
शेताची निवड केल्यानंतर शेताची मशागत करताना शेत खोलवर नांगरून 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. त्यानंतर तणांचे अवशेष व मागील पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून टाकून द्या जेणेकरून त्याबरोबर बुरशीचे बीजाणू शेताच्या बाहेर जातील.सारे किंवा गादीवाफे उतार बघून सोडा जेणेकरून पाणी शेतामध्ये साठणार नाही व पाण्याचा निचरा होऊन लवकर सुकेल. अशा प्रकारे शेताची मशागत केल्यास पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होणार नाही.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होऊ नये म्हणून अगोदरच हव्या त्या उपाययोजना करणे होय. रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ न देणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
रोप प्रक्रिया :
रोपांवर लागवडी अगोदर जर बुरशीनाशकांची प्रक्रिया केली तर रोप लागवडीनंतर रोपांवर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपांच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार होतो. ज्यामुळे बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांवर अंकुरु देऊ शकत नाहीत.रोप प्रक्रिया अशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
योग्य पाणी नियोजन :
बुरशीचा प्रादुर्भाव हा तेव्हा होतो जेव्हा शेतामध्ये जास्त काळ गरजेपेक्षा जास्त ओलावा असतो. ओलाव्यामध्ये या बुरशीचे बीजाणू मुळांवर अंकुरतात व ओलाव्यामार्फत एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. त्यासाठी या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी योग्य प्रकारे मातीच्या गुणवत्तेनुसार व प्रकारानुसार पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. याची माहिती घेण्यासाठी खालील फोटो किंवा लिंक वर क्लिक करा.
फवारणी नियोजन :
रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर पहिले पाणी देऊन खालीलपैकी एक फवारणी केल्यास रोपांची मर ही रोपवाटीकेमध्ये होणार नाही.
उपचारात्मक उपाययोजना
✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या उपाययोजना. यामध्ये पहिली उपायोजना आहे या बुरशीचा प्रसार रोखणे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी या रोगांची लक्षणे दिसायला लागली की शेताचे पाणी बंद करावे. जेणेकरून शेत कोरडे होईल व बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही
फवारणी नियोजन :
आपल्या शेतामध्ये जर रोपांची मर होऊ लागली असेल तर खालील पैकी एक फवारणी दाट करावी. .