Crop: कांदा | Topic: F.कांदा पिकात येणारे बुरशीजन्य रोग

जांभळा करपा (पर्पल ब्लॉच)

जबाबदार बुरशी 

✅ कांदा पिकामध्ये जांभळा करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Alternaria Porri या बुरशीमुळे होतो.
या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये रोपवाढीच्या अवस्थेमध्ये,कंद निर्मितीच्या अवस्थेमध्ये, कंद फुगवणीच्या अवस्थेमध्ये व कांदा काढणीच्या अवस्थेमध्ये होत असते.

पोषक वातावरण 

✅ जेव्हा तापमान 21०C ते 30०C च्या दरम्यान असते. आद्रता ही 80 ते 90% पेक्षा जास्त असते.त्याचबरोबर सकाळी धुके पडत असते. सतत पाऊस पडत असतो. अशा वातावरणामध्ये या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. 

लक्षणे 

✅ सुरुवातीला कांदा पातीवर पांढऱ्या रंगाचे खोलगट चट्टे पडतात. कालांतराने हे चट्टे जांभळ्या रंगांमध्ये रूपांतरीत होतात. तसेच यांचा आकार लंबवर्तुळाकार वाढत जातो.त्याचबरोबर याची प्रभावळ ही  पांढऱ्या किंवा फिकट पिवळसर रंगाची असते.अशा प्रकारे जिथे चट्टे पडलेले आहेत तिथून पात पिचकते व या चट्ट्यांचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्णपणे पात ही वाळत जाते. प्रादुर्भाव वाढेल तसा प्रसार वाढतो व प्रसार वाढल्यामुळे संपूर्ण शेतामध्ये याची लक्षणे आपणास दिसून येतात.याचा प्रसार वाढल्यानंतर संपूर्णपणे कांदा कंद हा खराब होऊन जातो त्याचबरोबर काही परिस्थितीमध्ये कांदा पिकांची मानकुज ही झालेली आपल्याला दिसून येते.

प्रसार 

✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रसार हा एका भागातून दुसऱ्या भागांमध्ये ज्यावेळीस आपण तुषार सिंचन पद्धतीद्वारे कांदा पिकाला पाणी देत असतो, त्याचबरोबर सकाळी धुके पडते त्यामुळे किंवा सतत रिमझिम पाऊस पडत असेल तर त्यामुळे कांदा पातीवर जो काही ओलावा निर्माण होतो त्या ओलाव्यामार्फत या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागामध्ये होत असतो. त्याचबरोबर शेतामध्ये शेत काम करत असताना मजुरांच्या हाताद्वारे किंवा शेती अवजारांद्वारे एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये या बुरशीचा प्रसार होत असतो. त्याचबरोबर सतत वाहणारे वारे किंवा हवेमार्फत बुरशीचे बीजाणू एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये शेतामध्ये पसरत असतात.अशा प्रकारे या बुरशीजन्य रोगांचा प्रसार एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होतो. 

एकात्मिक उपाययोजना 

✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त अडचणींवर एकत्रितपणे उपाययोजना करणे होय.यामध्ये आपण खालील एकात्मिक उपाय योजना करणे गरजेचे आहे.

शेताची निवड :
शेताची निवड करताना अशा जमिनीची निवड करा की ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असावी, म्हणजेच काळी-तांबट किंवा तांबट जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या काळ्या  किंवा गाळाच्या मातीची निवड  लागवडीसाठी करू नये. जेवढा जास्त काळ ओलावा राहतो, तेवढा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद व प्रसार गतीने होतो. त्याचबरोबर अशा जमिनीची निवड करा ज्या जमिनीमध्ये पाणी व पाण्याचा निचरा लवकर होईल. जेणेकरून रान लवकर वाफस्यावर येईल व कोरडे होईल. 

शेताची मशागत :
शेताची निवड  केल्यानंतर शेताची मशागत करताना शेत खोलवर नांगरून 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. त्यानंतर तणांचे अवशेष व  मागील पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून टाकून द्या जेणेकरून त्याबरोबर बुरशीचे बीजाणू शेताच्या बाहेर जातील.सारे किंवा गादीवाफे उतार बघून सोडा जेणेकरून पाणी शेतामध्ये साठणार नाही व पाण्याचा निचरा होऊन लवकर सुकेल. अशा प्रकारे शेताची मशागत केल्यास पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होणार नाही. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

✅ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होऊ नये म्हणून अगोदरच हव्या त्या उपाययोजना करणे होय. रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ न देणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

रोप प्रक्रिया :
रोपांवर लागवडी अगोदर जर बुरशीनाशकांची प्रक्रिया केली तर रोप लागवडीनंतर रोपांवर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपांच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार होतो. ज्यामुळे बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांवर अंकुरु देऊ शकत नाहीत.रोप प्रक्रिया अशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

योग्य पाणी नियोजन :
बुरशीचा प्रादुर्भाव हा तेव्हा होतो जेव्हा शेतामध्ये जास्त काळ गरजेपेक्षा जास्त ओलावा असतो. ओलाव्यामध्ये या बुरशीचे बीजाणू मुळांवर अंकुरतात व ओलाव्यामार्फत एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. त्यासाठी या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी योग्य प्रकारे मातीच्या गुणवत्तेनुसार व प्रकारानुसार पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. याची माहिती घेण्यासाठी खालील फोटो किंवा लिंक वर क्लिक करा. 

फवारणी नियोजन : 

रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर पहिले पाणी देऊन खालीलपैकी एक फवारणी केल्यास रोपांची मर ही रोपवाटीकेमध्ये होणार नाही.

उपचारात्मक उपाययोजना 

✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे  रोपांची मर होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या  उपाययोजना. यामध्ये पहिली उपायोजना आहे या बुरशीचा प्रसार रोखणे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी या रोगांची लक्षणे दिसायला लागली की शेताचे पाणी बंद करावे. जेणेकरून शेत कोरडे होईल व बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही

फवारणी नियोजन :

आपल्या शेतामध्ये जर रोपांची मर होऊ लागली असेल तर खालील पैकी एक फवारणी दाट करावी. .