Crop: कांदा | Topic: A.कांदा लागवडीपूर्वीचे नियोजन

टोमॅटो लागवडी पूर्वी शेताची मशागत कशी करावी?

  • नांगरटीचे महत्व
  • फणपाळी मारण्याचे फायदे
  • रोटाव्हेयर कधी व कसा मारावा
  • शेतीची मशागत करताना एकात्मिक किड, बुरशीजन्य रोग, व तण नियंत्रण कसे करावे.
नांगरटीचे महत्व  

टोमॅटो शेतीमध्ये टोमॅटो रोप लागवडीपूर्वी 20-25 दिवस अगोदर शेत उभे आडवे नांगरून घ्यावे व उन्हामध्ये पुढील 15-20 दिवस तापुन द्यावे. ज्याचा फायदा असा होतो की जास्त दिवस जमीन सूर्यप्रकाशात असल्यामुळे मागील पिकांच्या अवशेषांमध्ये व तणांच्या अवशेषांमध्ये जे बुरशीचे बिजाणू आणि किडींचे कोष जमिनीमध्ये असतात ते सूर्यप्रकाशामुळे निष्क्रिय होतात.जमीन उन्हामध्ये तापल्यामुळे जमिनीमधील ढेकळे फुटण्यास मदत होते.
जमीन नांगरट करत असताना ज्या बाजूला उतार आहे त्या दिशेला नांगरट न करता त्याच्या आडव्या दिशेला नागरट करावी. याचा फायदा असा होतो की पावसाचे पाणी शेताच्या बाहेर वाहून न जाता जमिनीमध्ये मुरते, ज्यामुळे जमिनीची होणारी धूप थांबते.
जमीन नांगरल्यामुळे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढतो, जमिनीमध्ये हवा खेळती राहते. ज्यामुळे मातीची उत्पादकता वाढते,तसेच जमिनीत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
जमिनीची नांगरट केल्यामुळे जुन्या पिकांचे व तणांचे अवशेषांचे जास्तीत जास्त भाग जमिनीमध्ये गाडले जातात. ज्यामुळे त्याचे विघटन होऊन जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो.
जमीन नांगरट केल्यामुळे ज्या जमिनी जाड आहेत जसे की तांबट जमीन, काळवट जमीन, गाळाची जमीन अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होतो.
 ज्या जमीनी हलक्या आहेत जसे की वाळूसार, मुरमाड, पांढरट जमीन अशा जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमीन नांगरट केल्यामुळे जमिनीमध्ये नायट्रोजन व पोटॅश चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
ज्या जमिनीची नांगरट केली आहे त्या जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढलेली दिसून येते.

फणपाळी मारण्यामागचे फायदे 

शेत नांगरूण घेतल्यानंतर शेतात फणपाळी मारावी, ज्यामुळे शेतामध्ये जी नांगरणीमुळे ढेकळे तयार झालेली असतात ती फुटतात.
फणपाळी मारल्यानंतर जमिनीमध्ये असणारे तणांचे व मागील पिकांचे अवशेष गोळा करून शेताच्या बाहेर टाकल्यामुळे त्याच्या बरोबर असणारी बुरशीचे बीजाणू व किडींची कोष शेताच्या बाहेर टाकले जातात, त्यामुळे येणाऱ्या पिकांमध्ये बुरशीचा व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो.

गादीवाफयाचे महत्व  

शेतामध्ये फणपाळी मारल्यानंतर हंगामानुसार 4.5 फुट किंवा 5 फुट गादीवाफे टाकून घ्यायचे आहेत.गादीवाफ्याचा टॉप हा 2 ते 2.5 फुट असावा, तर गादीवाफ्याची खोली 1 ते 1.5 फुट असावी.
ज्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते,तसेच जे मुळांच्या कक्षेमध्ये जास्तीचे पाणी असते त्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीमध्ये चांगल्या
प्रकारे वाढ होते.

रोटाव्हेयर कधी व कसा मारावा? 

शेताची मशागत करत असताना पहिली पायरी ही शेताची नांगरट करणे ही आहे. त्यानंतर दुसरी पायरी ही शेतात फणपाळी मारणे ही आहे.त्यानंतर तिसरी पायरी ही शेतामध्ये गादीवाफे टाकणे ही आहे.
जेव्हा फणपाळी मारल्यानंतर गादीवाफे टाकतो, तेव्हा त्या गादीवाफ्यांवर रासायनिक व सेंद्रिय खतांचा बेसल डोस टाकायचा आहे व तो टाकलेला बेसल डोस मातीमध्ये मिक्स करण्यासाठी रोटाव्हेयर गादीवाफ्यांवरती वरच्या वर मारायचा आहे.
रोटाव्हेयर मारताना मातीचे पिठासारखे बारीक कण होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. जर मातीचे बारीक पिठासारखे कण झाले तर मातीमध्ये दोन कणांमध्ये हवा आणि पाण्याचे गुणोत्तर बिघडते, ज्यामुळे मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रसार जमिनीच्या अधिकच्या ओलाव्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने होतो.

मशागतीचे टप्पे 

👉नांगरट करावी-20-25 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे👉फणपाळी मारावी-तणांचे व जुन्या पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर टाकावेत- 👉गादीवाफे सोडावेत👉गादीवाफ्यांवर रासायनिक बेसल डोस टाकावा👉बेसल डोस रोटाव्हेयरच्या सहाय्याने वरच्यावर मातीमध्ये मिक्स करावा.👉शेवटी गादिवाफे सोडावेत.